टेंभुर्णी: उजनी धरणातून शेतीसाठी कालव्यातून उन्हाळी हंगामातील पहिली पाळी दुपारी १ वाजता ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला असून, कालव्यातून २ हजार ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे.
सध्या उजनी धरणाचीपाणीपातळी ४८.३१ टक्के असून, धरणात २५.८८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. रब्बी हंगामातील पाणी पाळी १४ फेब्रुवारी रोजी बंद करण्यात आली होती.