सत्य–अहिंसेचे पुजारी : राष्ट्रपिता महात्मा गांधी 

 सत्य–अहिंसेचे पुजारी : राष्ट्रपिता महात्मा गांधी 
  • Positive News
  • ऑक्टोबर 2 2025

Share on  

 सत्य–अहिंसेचे पुजारी : राष्ट्रपिता महात्मा गांधी 

२ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला. जगाला सत्य, अहिंसा आणि सदाचार यांचा अमर संदेश देणारे हे महान संत राजकारणी म्हणून नव्हे तर मानवतेचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात.

महात्मा गांधींनी सत्याग्रह, असहकार आणि स्वदेशी आंदोलनाच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वाखालील दांडी मार्च, भारत छोडो आंदोलन ही स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाची पर्वे ठरली.

अहिंसा परमो धर्मः” हा त्यांचा जीवनमंत्र होता. शस्त्राऐवजी अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने साम्राज्यवादी सत्तेला आव्हान देऊन त्यांनी जगाला नवा आदर्श दाखवला. त्यांच्या विचारांनी नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग यांसारख्या जागतिक नेत्यांनाही प्रेरणा दिली.

गांधीजींचा जीवनमार्ग साधेपणाने परिपूर्ण होता. खादीचा प्रचार, स्वदेशी वस्तूंचा आग्रह आणि अस्पृश्यतेविरुद्धचा लढा या त्यांच्या कार्यातून सामाजिक एकतेचा संदेश मिळतो.

आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण बापूंना कोटी कोटी अभिवादन करून त्यांच्या शिकवणीची आठवण करूया –
“सत्य आणि अहिंसा हीच खरी ताकद आहे.” 

संबंधित बातम्या